Thursday, June 11, 2015


"मार"

मोठ्यांना नेहमी वाटतं आपण करु तेच योग्य...लहान आहेस तु लहान आहेस तु अस म्हणुन लहान मुलांना नेहमीच अंधारात ठेवलं जात..... नाही!!!.... कीती वाईट गोष्ठी मोठ्यांकडुनच तर होत असतात...जसे भ्रष्टाचार, बलात्कार, खुन हे सर्व माणुस मोठा झाला कीच करतो लहान पणी नाही...

भ्रष्टाचारी नेते मोठी मोठी भाषण झाडतात अगदी एखाद्या शाळेच्या कार्यक्रमात मुलांना प्रोत्साहनपर बाता मारतात पण मांडवली करायला बसले की कीती खाऊ आणि कीती नको असं होत ह्यांना...


प्रश्न मुळात हा आहे आपण मोठी मंडळी अस वागतोच का...आणि वागतोच तर लहानांकडुन चांगल्या वागण्याच्या अपेक्षांच ओझं तरी का देतो खांद्यावर???... आणि वरुन "मार" पण आहेच...म्हणजे शाळेतल्या मास्तुर्याचं बायकोशी झालेल्या भांडण्याच राग तो आमच्यावर काढणार...दुसर्यांनीच खेळताना फोडलेल्या खिडक्यांच्या काचांमुळे पण आम्हीच घरात बसायचं...आणि घरचे तर उठसुठ मालकी हक्क बजावतच असतात...आम्ही पोलीसात जाऊ शकत नाही...कारण त्यांचे डोळे बघुनच आमची फाटते...कस कसा जीव मुठीत धरुन आम्ही वरील आतंकवादाचा सामना करत असतो आम्हालाच ठाउक..

आता आम्हीपण मोठे होणारच कधीतरी पण नंतर काय बोलुन उपयोग तुमच्या सवयीही लागणारच आम्हाला...मग नक्की शहाणं कोण तुम्ही की आम्ही???

No comments:

Post a Comment