Thursday, June 11, 2015

21.2.2015


दिनांक 21.02.2015, शनिवार.
काल दि. 20.02.15 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता मंत्रालय दालन क्रमांक 601 मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात मंत्र्यांचे 2 सहायक, ऐरोली संघर्ष समितीतील 11 मुख्य सदस्य, MSRDCचे सहसंचालक श्री एस.एम.रामचंदानी, Executive Engineer श्रीमती परदेशी (व त्यांचे अन्य 2 सहकारी) , IRB/MEP चे मालक व व्यवस्थापकीय संचालक श्री जयंत म्हैसकर (व त्यांचे 5 अन्य सहकारी) अधिकारी असे 22 जण यांचेसोबत टोल संबंधित चर्चा करण्यासाठी एक एकत्रित मिटिंग आयोजित होती ह्या सभेस मंत्रीमहोदय घरघुति अडचणीमुळे दुपारी 3 वाजता  हजर नव्हते तरीही अर्धा ते पाउण तास वाट पाहुन सर्वानुमते सभा सुरु करण्यात आली सदर सभेदरम्यान सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या मुद्यांना विचारात घेऊन लवकर निर्णय घेवू , असा पवित्रा घेतला होता. परंतु आपल्या सदस्यांनी खारघर प्रमाणे आम्हाला देखील सूट/सवलत मिळाली पाहिजे ही मागणी लावून धरली. अनेक गोष्टी कागद पत्रांसोबत दाखविल्या असता, त्यांनी GR सम्बंधित व एकूणच टोल धोरणाविषयी अनेक विसंगति असल्याचे कबुल केले. परंतु  मंत्रीमहोदय नसल्याणे काहीच निर्णय त्यावेळेस शक्य नाही असे सांगितले व सभा 4:30 वाजता आटपण्यात आली.
परंतु आम्ही (ऐ.सं.स.)सर्वांनी मंत्रीमहोदय येइपर्यंत आम्ही थांबणार आहोत असे 4:40 वाजताच सांगितले. मंत्री शिंदे हे आर.आर. पाटील ह्यांच्या शोकसभेला जाउन मंत्रालयात येतील अशी माहीती देण्यात आली तरीही आम्ही मंत्र्याना भेटुन सभा पुर्ण करुनच जाणार ह्यावर ठाम होतो त्या दरम्यान IRB/MEP चे मालक व व्यवस्थापकीय संचालक श्री जयंत म्हैसकर व अन्य 4 सहकारी त्यांचा एक प्रतिनिधी मंत्रालयात बसवुन मंत्रालयातुन निघुन गेले मंत्रीमहोदय संध्याकाळी मंत्रालयात 6:20 वाजता आल्यावर ते इतर काम आटपुन सभेला 7:30 वाजता पुन्हा एकदा सुरुवात  झाली ह्या सभेत मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे, ऐरोली संघर्ष समितीतील 11 मुख्य सदस्य व MSRDCचे सहसंचालक श्री एस.एम.रामचंदानी, Executive  Engineer श्रीमती परदेशी , IRB/MEP चे एकच प्रतिनिधि असे 18 जण उपस्थित होते आपली मागणी व त्यांचे आधी दिलेले उत्तर यावर मंत्रीमहोदयांसमोर पुनश्च चर्चा झाली. परंतु ह्या संध्याकाळच्या सभेकरिता IRB/MEP चे मालक व व्यवस्थापकीय संचालक श्री जयंत म्हैसकर व त्यांचे अन्य 4 ते 5 सहकारी उपस्थित नव्हते. मंत्रीमहोदयांनी आपली मागणी हे त्यांची मागणी देखील असल्याचे सांगितले. यावेळी अनेक कागदपत्रे व सरकारी अनास्थेचे आम्ही ऐरोलिकर कसे बळी ठरत आहोत , याचे आम्ही पुरेपूर पुरावे उदहरणासाहित तेथे सादर केलेले आहे. अनेक मुद्दे पुढे ठेवून अथकपणे आम्ही सर्वांशि चर्चा केलेली आहे. परंतु कंत्राटदार ह्यावेळी नथांबल्याने ह्या विषयावर सर्वमान्य तोडगा काढण्याकरिता पुन्हा दोन-चार दिवसांनी मंत्रीमहोदयांनी भेटायला बोलविले आहे व ठीक 8:25 ला सभेची सांगता झाली.
सद्यस्थितीत आता पुढची भेट झाल्यावर आपल्या सर्वांना त्याची माहिती दिली जाईल, असे आम्ही आपणा सर्वांना सांगू इच्छितो.
-"ऐरोली संघर्ष समिती"
airolisangharshsamiti@gmail.com
धन्यवाद!

No comments:

Post a Comment