16.04.2015
आज भारतीय रेल्वेला 162 वर्ष पूर्ण झाली, ज्याज्या भागात रेल्वे गेली त्यात्या भागाचा विकास जलद गतीने होत गेला त्या विकासात रेल्वेच्या लाखो कामगारांचा हात आहे, देशातील सर्वात जास्त कामगार म्हणजेच 15 लाखाहून अधिक कामगार ह्या शासकीय संस्थेत सध्या आहेत... सिंधु, साहीब आणि सुलतान ह्या तीन इंजीनानी सर्वप्रथम ठाणे ते मुंबई छ.शि.ट. हा प्रवास केला... आज हीच दोन्ही स्थानकं सर्वाधिऐकतो, म्हणजे ज्यांचे ज्यांचे जन्म रेल्वेत झालेत त्यांना जन्मठिकाण "भारतीय रेल्वे" सांगायला काही हरकत नाही...रेल्वे प्रवासी टिकीटानंतर जर कुठुन महसूल कमावत असेल तर तो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतुन, दरवर्षी भारतातून 20 ते 25 लाख लोकं ह्या परीक्षा देतात वेगवेगळ्या राज्यांतुन काही हजार जागांकरता रेल्वे ही परीक्षा घेते पण त्याचा एक निश्चित कालावधी नसतो जस इतर सेवा परीक्षांचा असतो, ह्या सर्व प्रोसेस मधुन गेल्या कारणाने तसच रेल्वे हा जिव्हाळ्याच्या भाग असल्यामुळे ही माहीती मला आहे...आज हा विषय मांडण्याच कारण की कशी भ्रष्टाचाराची कीड इथेही लागलीय ते...
बारावी झाल्यानंतर एक सामान्य तरुण रेल्वेतील तिकीट तपासणीस पदाकरता व इतर क्लास2 अशा एकुण 3 पदांकरता मध्य रेल्वेतल्या 1500 जागांकरता अर्ज करतो...आणि अभ्यासाला लागतो साधारण पाच सहा महिन्यात त्याला hallticket मिळुन 1 दिड वर्षात सर्व परीक्षा देवुन नोकरीत रुजु होऊ ही त्याची मानसिकता असते पण घडतं काहीस असं......
तो वर्षभर वाट बघतो आणि अर्ज गेला नसेल किंवा काही चुकीमुळे बाद केला असेल...आणि शासकीय यंत्राणांशी संपर्क करुनही काही उत्तर मिळत नसल्याने हा विषय तो सोडुन देतो विसरुन जातो.....
अचानक "चार" वर्षांनी जूनमधे रेल्वेच पत्र आणि hallticket येत की आँक्टोंबर मधे परीक्षा आहे, पटकन त्याला आठवतही नाही की आपण कधी अर्ज केलेला...एव्हाना तो पदवीधर होऊन एक नोकरीही करु लागलेला असतो...पण ही संधी सोडायची नाही ह्या भावनेने तो जुलै मधे नोकरी सोडुन तीन महीने रेल्वे एके रेल्वेचा सपाटुन अभ्यास करतो स्पर्धा परीक्षांची बरीचशी पुस्तक तो वाचतो..... एव्हाना ही बातमी नातेवाईक व मित्रमंडळींमधे गेलेली असते....रेल्वेत मोठ्या पदावर आफीसरची परीक्षा देतोय म्हणे...
एक दिवस कुठल्यातरी शिफारशीने "तुला पाहीजेल त्या पोस्टवर तुला नोकरी मिळेल रेल्वेत"... ह्या सुचनेचा एक फोन वडीलांच्या खास मित्राचा येतो.........एकीकडे परीक्षा होऊन हा तरुण निकालची वाट पाहू लागलेला असतो......
"सहा लाख लागतील पण हमखास नोकरी काही करायची गरच नाही डायरेक्ट लिस्ट मधे नाव येईल ट्रेनिंगला जायच 3 महीने आणि पगार चालू दोन अडीच वर्षात पैसे रिकवर"... झालं घरातुन सहमती होती पण एकदम सहा लाख आणि तेही बिनभरवशाच्या माणसाला द्यायचे....मध्य रेल्वेतला एक बडा अधिकारी आहे (इथे नाव न घेता लिहीन असं ठरवल्यामुळे नाव टाकत नाही आहे) महीना 2.5 छापतो त्याची हीच काम आहेत रे सगळे बाबू आपल्या खिशात आहेत अस म्हणत ह्या पठ्याने एक दिवस भेट घालून द्यायचा प्रस्तावच टाकला काय करावं हा मोठा प्रश्न त्या तरुणासमोर ठाकला....
आता घरचेच तयार आहेत म्हटल्यावर तरुणाकडे स्वत: हो किंवा नाही हा एकच पर्याय होता...
पण तरीही तो गेला मुंबईतल्या त्या शासकीय इमारतीत कुठल्याही सौद्याकरता नाही तर एक खात्री करण्यासाठी त्याच्या त्याच वडीलांच्या खास मित्रासोबत...
ती अख्खी इमारत ह्याच्या बापाची आहे हे एव्हाना त्या तरुणाला कळलं होतं मित्राच्या वागण्यावरुन आणि बोलण्यातून.....
पण तो सौदा झालाच नाही कधी....
आणि त्या परीक्षेचा निकाल काय लागला हे पण त्या तरुणाने कधी पाहीलं नाही...
(ही घटना सत्य असून ह्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत तरीही आपण ह्यावर विश्वास ठेवावा ही जबरदस्ती लेखक आपणास करत नाही)
-सुंदर...!
तो वर्षभर वाट बघतो आणि अर्ज गेला नसेल किंवा काही चुकीमुळे बाद केला असेल...आणि शासकीय यंत्राणांशी संपर्क करुनही काही उत्तर मिळत नसल्याने हा विषय तो सोडुन देतो विसरुन जातो.....
अचानक "चार" वर्षांनी जूनमधे रेल्वेच पत्र आणि hallticket येत की आँक्टोंबर मधे परीक्षा आहे, पटकन त्याला आठवतही नाही की आपण कधी अर्ज केलेला...एव्हाना तो पदवीधर होऊन एक नोकरीही करु लागलेला असतो...पण ही संधी सोडायची नाही ह्या भावनेने तो जुलै मधे नोकरी सोडुन तीन महीने रेल्वे एके रेल्वेचा सपाटुन अभ्यास करतो स्पर्धा परीक्षांची बरीचशी पुस्तक तो वाचतो..... एव्हाना ही बातमी नातेवाईक व मित्रमंडळींमधे गेलेली असते....रेल्वेत मोठ्या पदावर आफीसरची परीक्षा देतोय म्हणे...
एक दिवस कुठल्यातरी शिफारशीने "तुला पाहीजेल त्या पोस्टवर तुला नोकरी मिळेल रेल्वेत"... ह्या सुचनेचा एक फोन वडीलांच्या खास मित्राचा येतो.........एकीकडे परीक्षा होऊन हा तरुण निकालची वाट पाहू लागलेला असतो......
"सहा लाख लागतील पण हमखास नोकरी काही करायची गरच नाही डायरेक्ट लिस्ट मधे नाव येईल ट्रेनिंगला जायच 3 महीने आणि पगार चालू दोन अडीच वर्षात पैसे रिकवर"... झालं घरातुन सहमती होती पण एकदम सहा लाख आणि तेही बिनभरवशाच्या माणसाला द्यायचे....मध्य रेल्वेतला एक बडा अधिकारी आहे (इथे नाव न घेता लिहीन असं ठरवल्यामुळे नाव टाकत नाही आहे) महीना 2.5 छापतो त्याची हीच काम आहेत रे सगळे बाबू आपल्या खिशात आहेत अस म्हणत ह्या पठ्याने एक दिवस भेट घालून द्यायचा प्रस्तावच टाकला काय करावं हा मोठा प्रश्न त्या तरुणासमोर ठाकला....
आता घरचेच तयार आहेत म्हटल्यावर तरुणाकडे स्वत: हो किंवा नाही हा एकच पर्याय होता...
पण तरीही तो गेला मुंबईतल्या त्या शासकीय इमारतीत कुठल्याही सौद्याकरता नाही तर एक खात्री करण्यासाठी त्याच्या त्याच वडीलांच्या खास मित्रासोबत...
ती अख्खी इमारत ह्याच्या बापाची आहे हे एव्हाना त्या तरुणाला कळलं होतं मित्राच्या वागण्यावरुन आणि बोलण्यातून.....
पण तो सौदा झालाच नाही कधी....
आणि त्या परीक्षेचा निकाल काय लागला हे पण त्या तरुणाने कधी पाहीलं नाही...
(ही घटना सत्य असून ह्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत तरीही आपण ह्यावर विश्वास ठेवावा ही जबरदस्ती लेखक आपणास करत नाही)
-सुंदर...!
No comments:
Post a Comment